नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुका संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. पत्रकार परिषदेकडे सर्व राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

