अकरा मतदारसंघात सरासरी १८.१८ टक्के मतदान
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूर २३.७७ टक्के तर हातकणंगले मतदार संघात २०.७४ टक्के मतदान झाले आहे.
मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
लातूर - २०.७४ टक्के
सांगली - १६.६१ टक्के
बारामती - १४.६४ टक्के
हातकणंगले - २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के

