अकरा मतदारसंघात सरासरी ३१.५५ टक्के मतदान
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे. कोल्हापूर ३८.४२ टक्के तर हातकणंगले मतदार संघात ३६.१७ टक्के मतदान झाले आहे.
मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
लातूर - ३२.७१ टक्के
सांगली - २९.६५ टक्के
बारामती - २७.५५ टक्के
हातकणंगले - ३६.१७ टक्के
कोल्हापूर - ३८.४२ टक्के
माढा - २६.६१ टक्के
उस्मानाबाद - ३०.५४ टक्के
रायगड - ३१.३४ टक्के
रत्नागिरी –सिंधुदूर्ग - ३३.९१ टक्के
सातारा - ३२.७८ टक्के
सोलापूर - २९.३२ टक्के

